कालवाडीच्या युवकाची सिमा सुरक्षा दलात निवड

गांवक-यांनी दिला जल्लोषात निरोप

अकोट –
येथून जवळच असलेल्या कालवाडी येथील तरुण चि.करण रविंद्र हिंगणकर यांची भारतीय सीमा सुरक्षा दलात(BSF) निवड झाली आहे.या निवडीबद्दल गांवक-यांत आनंद व्यक्त होत आहे.

येथील उद्योजक रविंद्र उत्तमराव हिंगणकर यांचा मुलगा करण पदवीधर असून त्यांने सैन्य दलाची परिक्षा उतिर्ण झाल्याने त्याला देश सेवेची संधी प्राप्त झाली.दि.२६ ला तो गुजरात राज्यातील येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाला.गांवक-यांनी विशेषतः क्षत्रिय कुलावंत गृपच्या तरुणांनी त्याला जल्लोषात निरोप दिला

दरम्यान करणचा गांवक-यांचे वतीने सेवा सहकारी सोसायटीचे माजी सभापती प्रमोद पाटील यांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार पार पडला.यावेळी माजी सरपंच दादासाहेब हिंगणकर , नंदकिशोर हिंगणकर राहूल हिंगणकर ,गणेशराव हिंगणकर , सुधाकरराव हिंगणकर,संतोष हिंगणकर , प्रमोद रावणकार, शरद हिंगणकर ,रवि येवले,ऋषी हिंगणकर ,नागोराव कराळे,क्षत्रिय कुलवंत गृपचे गौरव हिंगणकर व त्यांचे सहकारी युवक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top