आधार कार्डचे पोर्टल बंद , ई-केवायसी ठप्प

पीकविम्यासह इतर कामांसाठी शेतकऱ्यांना मारावे लागत आहे चकरा

अचलपूर ( प्रतिनिधी)- गेल्या दहा दिवसांपासून शासनाचे आधार पोर्टल बंद आहे. यामुळे ईकेवायसी यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. शेतकरी आधार प्रमाणिकरणासाठी महा ई- सेवा केंद्रात अनेक चकरा मारत आहेत. यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. आधारचे पोर्टल लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना घ्यावयाच्या असतील तर आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे असते. गेल्या दहा दिवसांपासून आधारचे पोर्टल बंद असल्यामुळे महा ईसेवा केंद्रातील ई- केवायसी, आपले सरकार, महा डीबीटीवरील सर्व सेवा, रब्बीचा पीकविमा, शेतीशी निगडित विविध योजनांचा लाभ आधारकार्डचे प्रमाणिकरण केल्यानंतर मिळतात. शासनाच्या विविध योजनांची साईट गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. अचलपूर तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी महा ई सेवा केंद्रावर चकरा मारत आहेत. परंतु साईट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने आल्या पावलाने परत जावे लागत आहे. परंतु शासन स्तरावर याची दखल घेतली जात नसल्याने विविध योजनेपासून शेतकरी वर्ग वंचित राहणार असल्याचे चित्र आहे . शासनाने संबंधीत साईट तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top