राज्यभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना आपापल्या गावांमध्ये गावबंदी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या १०९ गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावाच्या चौका-चौकात लागलेले आहेत. लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि पंढरपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून …